गेला महिना दोन महिने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभुषण पुरस्कार जाहीर झाल्यापासून जी वातावरण निर्मिती केली गेली त्याविषयी थोड व्यक्त व्हावं अस वाटत .
ज्याला जो लेखक
आवडतो त्याने त्या
लेखकाची पुस्तके वाचावीत आम्हाला
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि
पानिपतकार विश्वास पाटील यांनी
लिहिलेला इतिहास आवडतो आम्ही
तोच वाचणार आणि
तोच फॉलो करणार
, आणि कुणाला इतर
लेखकांचा इतिहास आवडत असेल
तर त्यांनी तो
वाचवा तो फॉलो
करावा , शेवटी हा ज्याच्या
त्याच्या वैयक्तिक आवडीचा प्रश्न
आहे .
बाबासाहेब पुरंदरे यांनी
शिवचरित्रात शिवाजी महाराज आणि
राजमाता जिजाऊ साहेब यांची
बदनामी केल्याचा जो आक्षेप
घेतला जातो तो
साफ चुकीचा आहे
.
जो ग्रंथ गेली पन्नास
वर्ष अस्तित्वात आहे
त्या ग्रंथांमध्ये बदनामी
झाल्याच गेल्या १० वर्षातच
कस लक्षात आल
? याआधी ज्या लाखो
लोकांनी ते पुस्तक
/ ग्रंथ विकत घेऊन
वाचल त्यातल्या एखाद्या
सामान्य वाचकाच्या मनात अशा
शंका का आल्या
नाहीत ?
आपल्याला जर कावीळ
झाली असेल तर
आपल्याला सगळ जग
पिवळ दिसायला लागत
तसच हे आरोप
करणाऱ्या लोकांना जातीयवादाची कावीळ
झाली आहे .
आणि शिवशाहीर
बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्र
सरकारकड पुरस्कार मागायला गेले
नव्हते . महाराष्ट्र सरकारने तो
जाहीर केला आणि
दिला , त्यामुळ आता या
वादावर पडदा टाकणे
आवश्यक आहे .
