badge

Friday, August 21, 2015

महाराष्ट्रभुषण


                                                               गेला महिना दोन महिने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभुषण पुरस्कार जाहीर झाल्यापासून जी वातावरण निर्मिती केली गेली त्याविषयी थोड व्यक्त व्हावं अस वाटत  . 
                                ज्याला जो लेखक आवडतो त्याने त्या लेखकाची पुस्तके वाचावीत आम्हाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पानिपतकार विश्वास पाटील यांनी लिहिलेला इतिहास आवडतो आम्ही तोच वाचणार आणि तोच फॉलो करणार , आणि कुणाला इतर लेखकांचा इतिहास आवडत असेल तर त्यांनी तो वाचवा तो फॉलो करावा , शेवटी हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडीचा प्रश्न आहे .
                                  बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रात शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब यांची बदनामी केल्याचा जो आक्षेप घेतला जातो तो साफ चुकीचा आहे .
                                                              जो ग्रंथ गेली पन्नास वर्ष अस्तित्वात आहे त्या ग्रंथांमध्ये बदनामी झाल्याच गेल्या १० वर्षातच कस लक्षात आल ? याआधी ज्या लाखो लोकांनी ते पुस्तक / ग्रंथ विकत घेऊन वाचल त्यातल्या एखाद्या सामान्य वाचकाच्या मनात अशा शंका का आल्या नाहीत ?
आपल्याला जर कावीळ झाली असेल तर आपल्याला सगळ जग पिवळ दिसायला लागत तसच हे आरोप करणाऱ्या लोकांना जातीयवादाची कावीळ झाली आहे .
                                                          आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्र सरकारकड पुरस्कार मागायला गेले नव्हते . महाराष्ट्र सरकारने तो जाहीर केला आणि दिला , त्यामुळ आता या वादावर पडदा टाकणे आवश्यक आहे .